शहरातील शाळा सुरू करण्याबाबत लवकरच निर्णय : वर्षा गायकवाड




👉 कोरोना (corona) नियमांचे पालन करीत ग्रामीण भागातील आठवी ते बारावी पर्यंतचे वर्ग 15 जुलैपासून सुरू करण्यात येणार आहेत त्यानंतर आढावा घेऊन लवकरच शहरी भागातील शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी शनिवारी दिली लाॅकडाऊन मुळे शिक्षणात खंड पडल्यामुळे बालविवाह, बालमजुरी, मुला मुलींच्या गळतीचे प्रमाण वाढले

मुलांचे आणखी शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शासनाने ग्रामीण भागातील आठवी ते बारावी पर्यंतचे वर्ग कोरोना मुक्त गावात सुरू करण्याचे जाहीर केले मागील दीड वर्षापासून कोरोणामुळे प्रत्यक्ष शाळा सुरू करणे शक्य नसल्याने ऑनलाईन अध्यापनासाठी शासनाने परवानगी दिली होती कोरोना मुक्त असलेल्या गावात आठवी ते बारावी पर्यंतचे वर्ग सुरू करण्यासाठी सुधारित शासन निर्णय जाहीर करण्यात आला त्या यानुसार 15 जुलैपासून शाळा सुरू होतील यासाठी स्थानिक प्रशासनाकडून तयारी सुरु करण्यात आली आहे 15 जुलैपासून कोरोना मुक्त गावातील शाळा सुरू झाल्यानंतर शहरी भागातील शाळाही सुरू करण्याबाबत शासनाकडून हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत सर्व जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन लवकर शहरी भागातील शाळा देखील सुरू करण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले शहरी भागातील शाळा सुरू करण्यासंदर्भात राज्यातील अनेक पालक तसेच स्थानिक आमदारांकडून विचारणा केली जात आहे ग्रामीण भागातील शाळा सुरू झाल्यानंतर मागील वर्षी प्रमाणे टप्प्याटप्प्याने शहरी भागातील शाळा देखील सुरू करण्यात येतील याबाबत शिक्षण विभागाकडून परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202107091753143407.pdf


विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर (प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक)

1 टिप्पणी:

  1. विद्यार्थी व शिक्षकों को वेक्सीन लगना अनिवार्य है।
    इसके बिना स्कूल शुरू करना खतरनाक हो सकता है

    उत्तर द्याहटवा