17 ऑक्टोबर दिनविशेष


*17 ऑक्टोबर दिनविशेष 2022 !*
    🧩 *सोमवार* 🧩

💥 *प्रबोधनकार ठाकरे जन्मदिन*
 
       
         🌍 *घडामोडी* 🌍    
 
👉 *1996 - भारतीय महाराष्ट्रीयन मराठी व हिंदी चिञपट अभिनेते डाॅ.श्रीराम लागू यांना मध्यप्रदेश सरकारचा कालिदास सन्मान जाहीर करण्यात आला*         
👉 *1979 - मदर टेरेसा यांना शांततेच्या नोबेल पुरस्कार बहाल करण्यात आला*

            🔥🔥🔥🔥
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर* 
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर) 
9860214288, 9423640394
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹


🌍 *जन्म*

👉 *1955 - अभिनेञी स्मिता पाटील  यांचा जन्म*
👉 *1947 - चिञपट अभिनेञी, निर्माती, दिग्दर्शक सिम्मी गरेबाल  यांचा जन्म*

        🌍 *मृत्यू*🌍

👉 *2008 - इनटरनॅशनल फेडरेशन ऑफ बाॅडीबिल्डिगं ॲड फिटनेस चे सहसंस्थापक बेन व्हिडर यांचे निधन*
👉 *1993 - चिञपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथालेखक विजयशंकर जग्नेश्र्वर तथा विजय भट  यांचे  निधन*
 
🙏 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆                                                                                      ■■■■■■■■■■■■■
 *सुविचार: Take the time today to be good to you, in thoughts, deeds and actions--but especially in your thoughts*                                 ◆━━━━━━━━━━━◆                                                                                                                                    ◆━━━━━━━━━━━◆                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                             *आजची बोधकथा                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                     👩‍💻 THE SINGING HIPPO* 👨‍💻.                                                                                                                                                      
◆━━━━━━━━━━━◆
*Once upon a time, a hippopotamus lived in a river next to a big and solitary tree.*
*One day, a bird came and nested in the tree. The songs and the flight of the bird caused such envy in the hippo that he couldn't think of anything else. Every day he would lament the fact that he had been born a hippo. This, despite the many times the bird told the hippo he was so lucky to be so big and such a good swimmer.*
*Finally, the hippo made his mind up that he would come out of the river, climb the tree, go out to perch on a branch, and start singing. However, when he tried to climb the tree it was all too clear* *that the hippo didn't have wings, nor claws to climb with, and* *neither could he hop.*
*Realising that he would never manage it, he angrily rammed his whole weight against the tree until it came crashing to the ground. Then, triumphantly, he stepped onto the leaves of the fallen tree, and began singing.*
*Unfortunately, hippos can't sing either. All that came from his mouth were horrible noises, and when the other animals heard this they all gathered round to make fun of the hippo standing on the branch of a fallen tree, trying to sing like a bird.*
*He was so embarrassed by this that he decided to never again regret being a hippo. He also felt bad about having knocked the tree over. He used all his strength to raise the tree back up again, replant it, and look after it until it had completely recovered.*
◆━━━━━━━━━━━◆                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                  
◆━━━━━━━━━━━◆
        © *प्रश्नमंजुषा*   
➖➖➖➖➖➖➖➖➖                                                                                              *१)राष्ट्रीय लोकसंख्या आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत?      
उत्तर- नरेंद्र मोदी                                             २)भारतातील व्याग्र प्रकल्प योजनेचे जनक कोण?    
उत्तर  - कैलास सांकला                                                                                     ३)कितव्या घटना दुरुस्ती अनव्ये पंचायत समितीला घटनात्मक दर्जा दिला?*    
उत्तर  - 3.73 व्या                                                                                                        ▬▬▬▬➖➖➖▬▬▬▬                                           🎯 *ठळक घडामोडी*
▬▬▬▬➖➖➖▬▬
■ *प्रचलित अनुदानासाठी महाराष्ट्रातील तमाम शिक्षक संघटना तसेच शिक्षकांनी आझाद मैदानात या-के.पाटिल*
■ *माझा पगार ही माझी जबाबदारी मुंबईची ही शेवटची वारी सर्व शिक्षकांनी आंदोलनासाठी उपस्थित रहा.*
■ *पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या दातांवर उपचार सुरू असतानाच बत्ती गुल; डीनसह डॉक्टरांची भंबेरी उडाली, औरंगाबादच्या शासकीय दंत रुग्णालयातील घटना*
■ *जागतिक उपासमार निर्देशांकात भारताची 107 व्या स्थानी घसरण, पाकिस्तान-बांग्लादेशही भारताच्या पुढे*
■ *रोमहर्षक सामन्यात नेदरलँडचा युएईवर तीन विकेट्सनी विजय, अखेरच्या षटकापर्यंत रंगतदार झाला सामना*
▬▬▬▬➖➖➖▬▬▬▬
*मिलिंद व्हि वानखेडे*
*मुख्याध्यापक*
*प्रकाश हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज  कान्द्री-माईन*
*9860214288*
➖➖➖➖➖➖➖➖➖
*🇮🇳 स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव 🇮🇳*
➿➿➿➿➿➿➿➿➿
       🇮🇳 *गाथा बलिदानाची* 🇮🇳
                 ▬ ❚❂❚❂❚ ▬                  संकलन : सुनिल हटवार ब्रम्हपुरी,          
             चंद्रपूर 9403183828                                                      
➿➿➿➿➿➿➿➿➿
📚✍️🏢🇮🇳👨🏻🇮🇳🏢✍️📚

        *सर सय्यद अहमद खान*
*(केसीएसआय समाज सुधारक)*

   *जन्म : 17 ऑक्टोबर 1817*
     (दिल्ली , मोगल साम्राज्य)

     *मृत्यू  : 27 मार्च 1898*
                (वय 80)
        (अलिगड , ब्रिटिश भारत)

राष्ट्रीयत्व : ब्रिटिश भारतीय
इतर नावे : सर सय्यद
उल्लेखनीय कार्य : पवित्र कुराण वर मोहम्मदान भाष्य
(कुरानवरील तफसीर)
पुरस्कार : इम्पीरियलऑर्डर क्राउनइंडिया रिबन.gif स्टार ऑफ इंडिया
युग:19 वे शतक
शाळा : इस्लामिक आणि नवनिर्मितीचा काळ तत्वज्ञान
संस्था : ईस्ट इंडिया कंपनी
भारतीय न्यायिक शाखा
अलीगड मुस्लिम विद्यापीठ
पंजाब विद्यापीठ
शासकीय महाविद्यालयीन विद्यापीठ
मुख्य स्वारस्ये : व्यावहारिकता , आधिशास्त्र , भाषा , सौंदर्यशास्त्र आणि ख्रिश्चन आणि इस्लाम
उल्लेखनीय कल्पना : मुस्लिम पाश्चात्य कल्पनांचा अवलंब
प्रभाव : थॉमस वॉकर अर्नोल्ड , जॉन लॉक , थॉमस पेन , गॉटलिब लेटनर
प्रभावशाली : पाकिस्तान चळवळ , अलिगड चळवळ , मुस्लिम लीग , बर्माचा लॉर्ड माउंटबॅटन , झियाउद्दीन अहमद , परवेझ मुशर्रफ आणि त्यांचे विचार पाकिस्तानच्या राष्ट्रीय राजकारणामध्ये महत्वपूर्ण आहेत.

मुस्लीम समाजप्रबोधनाच्या श्रेयनामावलीत अग्रभागी असणारे सर सय्यद अहमद खान यांचा जन्म १७ ऑक्टोबर १८१७ चा. 

राजा राममोहन रॉय, महात्मा फुले यांच्या कार्यकाळाच्या आसपासचे व मुस्लीम समाजप्रबोधनाच्या इतिहासात वेगळा ठसा उमटवताना धर्मवाद्यांचे लक्ष्य ठरलेले सर सय्यद अहमद खान यांचे व्यक्तित्व आणि योगदान त्यांच्या जयंतीच्या निमित्तानेही स्मरले जात नाही याचे आश्चर्य वाटते. सर सय्यद अहमद खान यांच्या विचारांची प्रासंगिकता आजही महत्त्वाची वाटते. विशेषत: त्यांच्या शैक्षणिक योगदानाचे स्मरण आणि त्यातून बोध घेण्याची गरज मुस्लीम नेतृत्वाला आहे. भविष्य आणि वर्तमानकाळ घडवण्यासाठी सर सय्यद अहमद खान यांच्या कार्याचे, विचारांचे चिंतन योग्य पद्धतीने केले गेले नाही याची किंमत मुस्लीम समाज आजही फेडताना दिसतोय. मुस्लीम समाजाची आजची सामाजिक- आर्थिक- शैक्षणिक दुरवस्था बाजूला करण्यासाठी समाजनेतृत्वाने सर सय्यद अहमद खान यांच्या कार्यापासून प्रेरणा घेतली पाहिजे.

प्रसिद्ध इतिहासतज्ज्ञ डॉ. रामचंद्र गुहा यांचे ‘मेकर्स ऑफ मॉडर्न इंडिया’ अर्थात आधुनिक भारताचे शिल्पकार हे पुस्तक २०१० मध्ये प्रकाशित झाले. यात आधुनिक भारतावर प्रभाव टाकणाऱ्या एकवीस विचारवंतांचा समावेश केला आहे. यात फक्त तीन मुस्लीम विचारवंत नोंदवले आहेत. सर सय्यद अहमद खान, बॅ. मोहंमद अली जीना आणि हमीद दलवाई. डॉ. गुहा यांनी त्यांना अनुक्रमे आधुनिकतावादी मुस्लीम, विभक्ततावादी मुस्लीम आणि शेवटचे आधुनिकतावादी असे संबोधले आहे.

प्रभावशाली सर सय्यद अहमद खान यांचा जन्म उच्च, आश्रफी अशा राजघराण्यातील असल्यामुळे तो वैचारिक वारसा त्यांच्या व्यक्तिमत्त्वात प्रतिबिंबित होतो. खान यांचे आजोबा मुघल साम्राज्यातील एक प्रधानमंत्री होते. त्या अर्थाने हे कुटुंब फार परंपरावादी नव्हते.  खान यांचे प्राथमिक शिक्षण घरातच झाले. त्यांच्या आईने आणि महिला शिक्षिकेने त्यांना शिकवले व नंतर पारंपरिक शाळेतून खान यांनी उर्दू, अरबी, पर्शियन व इतर भाषांवर प्रभुत्व मिळवले. वयाच्या विसाव्या वर्षी त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीत नोकरी धरली. कुटुंबीयांना हे रुचले नव्हते. राजघराण्यातील सर सय्यद अहमद खान यांना भारताचे भविष्य काय असणार आहे याचे अचूक आकलन झाले होते. त्याचसाठी त्यांनी ही नोकरी धरली आणि साध्या लिपिकापासून ते उत्तर भारतातील प्रमुख शहरांचे न्यायाधीश म्हणून काम पाहिले. राजा राममोहन रॉय यांच्याप्रमाणेच त्यांनी विविध भाषांत पुस्तके लिहिली.  सर सय्यद अहमद खान यांचे सर्वात मोठे योगदान म्हणजे मुस्लीम समाजाने आधुनिक शिक्षणाचा स्वीकार करावा, आधुनिक इंग्रजी शिक्षणातूनच मुस्लीम समाजाची प्रगती होईल आणि समाजाला प्रतिष्ठा मिळेल असा त्यांचा आग्रह होता. ब्रिटिशांनी देऊ केलेल्या प्रशासनातील नोकरीच्या संधीचा फायदा मुस्लिमांनी घ्यावा व त्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता अवगत करावी, असा संदेश ते पुन्हा पुन्हा देत होते. आधुनिक शिक्षणाच्या प्रसारासाठीच त्यांनी १८६४ मध्ये ‘सायंटिफिक सोसायटी फॉर मुस्लीम’ची स्थापना केली. आधुनिक इतिहास, विज्ञान, राजकीय अर्थशास्त्राबरोबरच इंग्रजी शिक्षणाचा अभ्यासक्रम शिकवला जाऊ लागला.

खान यांची अशी धारणा होती की, मुस्लीम समाजाचे कल्याण हे दोन प्रमुख घटकांवर अवलंबून आहे. त्यातील पहिला घटक म्हणजे मुस्लीम समाजाने आधुनिक पाश्चिमात्य शिक्षणाचा अंगीकार करावा आणि दुसरा भाग म्हणजे प्रशासनातील नोकरीचे महत्त्व समजून घेऊन ऐहिक उन्नती करावी. सुमारे दीडशे वर्षांपूर्वीच त्यांनी मुस्लीम समाजाला ही कल्पना दिली होती की ‘मुस्लीम समाजाने पारंपरिक शिक्षण बाजूला सारून आधुनिक शिक्षण घेतले नाही व शासकीय नोकऱ्यांची संधी घेतली नाही तर मोठी अवनती होईल. मुस्लीम समाजाची स्थिती भारतातील मागास जातीपेक्षाही मागास होईल आणि हा समाज इतका अवमानित- अपमानित होईल की पुन्हा यांना स्वाभिमानाने- सन्मानाने डोके वर काढता येणार नाही.’ मुस्लीम समाजाने खान यांच्या निर्देशाकडे केवळ दुर्लक्षच केले नाही तर खान यांच्या विरोधात मोहीम उघडली. परंपरावादी समाजात आधुनिकतेचा शिरकाव होऊ दिला नाही. उलट खान यांनाच ‘काफीर’ ठरवण्यात आले. खान हे ख्रिस्ताळलेले व इंग्राजळेले कसे आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न केला. कुचकामी मदरसा शिक्षणाचा आग्रह कायम ठेवला आणि आत्मवंचना केली.

आजची मुस्लीम दुरवस्था न्या. राजेंद्र सच्चर, न्या. रंगनाथ मिश्रा, तसेच डॉ. महेमूद-उर-रेहमान अभ्यास गटाने स्पष्ट केली आहे. आजही पदवीधरांची संख्या चार टक्के आहे. आजही मदरसा शिक्षणाचा आग्रह आहेच, मदरशात आधुनिक शिक्षणाचा समावेश नको आहे, मुख्य प्रवाहातील शिक्षणाकडे पाठ फिरवली जाते. ही पारंपरिक मानसिकता जोपासण्याचा आग्रह सोडला नाही तर ‘एक अविद्या’ किती ‘अनर्थ’ करू शकते याचा पुन्हा प्रत्यय घेणे न परवडणारे ठरेल. आत्मकोषातून बाहेर पडूनच नव्या आव्हानांना सामोरे जाता येईल. बाह्य़ समाजाशी संवाद आणि समावेशकता प्रस्थापित करून आमची साहित्य, समाज, राजकारणातील प्रगती साध्य करता येईल. हा सर सय्यद अहमद खान यांचा संदेश आजही दिशादर्शक आहे.

१८६९ मध्ये सर सय्यद अहमद खान यांनी इंग्लंड दौरा करून तेथील महत्त्वाच्या- प्रतिष्ठित लोकांशी संवाद केला. इंग्रजांसाठी इंग्रजीत साहित्य तयार केले. मोहंमद पैगंबरांवर निबंध लिहिलेले त्यांचे पुस्तक उदारमतवादी इस्लामचे दर्शन घडवतात. ‘इस्लाम हा तलवारीचा धर्म आहे’ ही प्रचलित प्रतिमा दूर करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. इंग्लंडमध्ये असतानाच त्यांनी मुस्लिमांना आधुनिक शिक्षण देण्यासाठी महाविद्यालयाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला. अनेक ठिकाणी भेटी देऊन निधी जमवला आणि २४ मे १८७५ मध्ये अलिगड येथे ‘द मोहंमदन अँग्लो-ओरिएंटल कॉलेज’ची स्थापना केली. मुस्लीम कुटुंबीयांना प्रत्यक्ष भेटून महाविद्यालयीन शिक्षणासाठी आवाहन केले. १८९३ मध्ये त्यांनी आपल्या भाषणात हिंदू-मुस्लीम यांच्या शिक्षणातील तफावत दाखवताना मुस्लीम समाजाची विदारकता स्पष्ट केली. सर सय्यद अहमद खान यांचे १८९७ मध्ये निधन झाले. त्यानंतर १९२० मध्ये मोहंमदन अँग्लो-ओरिएंटल कॉलेजचे अलिगढ मुस्लीम युनिव्हर्सिटी असे नामांतर झाले. समाजात सुधारणा व्हावी, सज्ञानता वाढावी यासाठी ‘मोहंमदन सोशल रिफॉर्मर’ प्रकाशित करण्यात येत असे. शिक्षण, समाजसुधारणा, आधुनिकतेवर लोकशिक्षण करणाऱ्या या नियतकालिकावर प्रतिगाम्यांनी तोंडसुख घेऊन विरोध दर्शवला. समाजाने सुधारणेची परंपरा स्वीकारण्याऐवजी- सुधारकालाच विरोध करण्याची परंपरा चालू ठेवली, हे या समाजाच्या अधोगतीचे प्रमुख कारण ठरले आहे.

सर सय्यद अहमद खान यांच्यावर असा एक आक्षेप घेण्यात येतो की, त्यांनी भारतात दोन राष्ट्रे अस्तित्वात असल्याचे बीजारोपण केले. हिंदूंचे राष्ट्र आणि मुस्लिमांचे वेगळे राष्ट्र. ही वस्तुस्थिती दाखवत असतानाच खान यांनी हिंदू व मुस्लीम हे भारतातील प्रमुख धर्मसमूह जणू एकाच शरीराचे दोन प्रमुख अवयव असल्याचे सांगितले. जे एकमेकांना पूरकही ठरू शकतात. सर सय्यद खान यांचे विवेचन असे की, ‘मानवी जीवनाची दोन अंगे असतात. त्यातील पहिला भाग मानवाने त्यांच्या ईश्वरावर ठेवलेली श्रद्धा आणि दुसरा भाग म्हणजे आपल्या समाजातील अन्य समुदायाबद्दल असणारी नैतिक सहानुभूती, ईश्वराबद्दलची श्रद्धा व तो वाटा ईश्वराला देऊ. पण अन्य समूह घटकांशी नैतिक सहानुभूतीने वागण्याचा जो भाग आहे त्याच्याशी बांधिलकी व्यक्त करता आली पाहिजे.

भारतातील हिंदू-मुस्लीम हे एखाद्या नववधूच्या दोन डोळ्यांसारखे आहेत. या दोन डोळ्यांना इजा झाल्यास भारतरूपी नववधूचे सौंदर्य नष्ट होईल ही  खान यांच्याकडून पुन्हा पुन्हा व्यक्त झालेली दिसते.

सर सय्यद खान हे ब्रिटिशधार्जिणे असण्याचा एक आरोप करण्यात येतो. हा आरोप राजा राममोहन रॉय, महात्मा फुले व समकालीन विचारवंतांवर केला जातो. अनेक प्रकारच्या पारंपरिक समस्यांच्या निराकरणासाठी ब्रिटिशांकडे इष्टापत्ती म्हणून पाहण्याचा हा दृष्टिकोन होता. सर सय्यद अहमद खान हे आश्रफी वर्गातील असल्यामुळे त्यांनी तळागाळातील समाजाबद्दल आस्था दाखवली नाही तसेच महात्मा फुल्यांनी स्त्रीदास्यमुक्तीचा विचार दिला तसा दृष्टिकोन खान साहेबांनी दिला नाही, धर्मसुधारणा करण्याचा प्रयत्न केला. मात्र तर्कशुद्ध चिकित्सा केली नाही, अशा व्यक्तिमत्त्वातील मर्यादा दाखवण्यात येतात. हे असे असले तरी एखादे मूल्यमापन करताना त्या काळातील सामाजिक- राजकीय- ऐतिहासिक बाजूही विचारात घ्यावी लागते. या अर्थाने खान हे भारतीय मुस्लीम प्रबोधनातील प्रमुख मानबिंदू आहेत, हे नाकारता येणार नाही. आजही मुस्लीम समाजातील तरुणांकडे पात्रता नाही म्हणून संधीपासून दूर राहावे लागते. समाजाला आत्मविश्वास मिळवून देण्यासाठी, सन्मानाने राहण्यासाठी, भारतीय समाजाला अधिक चांगले योगदान देण्यासाठी सर सय्यद अहमद खान यांच्या जीवनकार्यातून प्रेरणा मिळतील. सर सय्यद अहमद खान यांचा आधुनिक शिक्षणाचा मंत्रच मुस्लीम समाजाच्या समस्या सोडवण्यास समर्थ करणार                                                                                                                                                                                                                                               ➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा