17 फेब्रुवारी दिनविशेष


*17 फेब्रुवारी दिनविशेष 2023 !*
🛟 *शुक्रवार* 🛟


💥 *बळवंत फडके स्मृतीदिन*
    
         🌍 *घडामोडी* 🌍    

👉 *1996 - महासंगणक डीप ब्लु बुध्दिबळात गॅरी कास्पारोव्ह चा पराभव झाला*
👉 *1927 - रणदुंदुभी नाटकाचा पहिला प्रयोग झाला*

       🌹🌹🌹🌹🌹🌹
*विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर* 
(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर) 
9860214288, 9423640394
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹


🌍 *जन्म*🌍

👉 *1951 - जगदीश मोहंती  - भारतीय लेखक आणि अनुवादक  यांचा जन्म*
👉 *1963 - जे हसून हुआंग  - एनव्हीडिया चे सहसंस्थापक  यांचा जन्म*

        🌍 *मृत्यू*🌍

👉 *1978 - पुरुषोत्तम शिवराम रेगे  - कांदबरीकार ,नाटककार आणि कवी, समीक्षक  यांचे निधन*
👉 *1986 - जे. कृष्णमूर्ती- भारतीय तत्वज्ञान  यांचे निधन*
 
🙏 *मिलिंद विठ्ठलराव वानखेडे*🙏
➖➖➖➖➖➖➖➖➖
*🇮🇳 स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव 🇮🇳*
➿➿➿➿➿➿➿➿➿
       🇮🇳 *गाथा बलिदानाची* 🇮🇳
                 ▬ ❚❂❚❂❚ ▬
     संकलन ~ सुनिल हटवार ब्रम्हपुरी,
               चंद्रपूर, 9403183828
➿➿➿➿➿➿➿➿➿                                                  
💥🤺⛓️🇮🇳👨🏻‍🦱🇮🇳⛓️🏇🔫                

       *आद्यक्रांतिकारक वासुदेव*  
                 *बळवंत फडके* 

       *जन्म : 4 नोव्हेंबर 1845*
 (शिरढोण, ता. पनवेल, जि. रायगड)
       *मृत्यू : 17 फेब्रुवारी 1883*
                   (एडन, येमेन)

 *वडील : बळवंत फडके*

*प्रभाव : महादेव गोविंद रानडे, क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे*

     वासुदेव बळवंत फडके यांना भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील आद्य क्रांतिकारक किंवा सशस्त्र क्रांतीचे जनक मानले जाते. फडक्यांचे आजोबा नजीकच्या कर्नाळा किल्ल्याचे किल्लेदार होते. लहानपणीच फडक्यांना कुस्ती घोडेस्वारी आणि तलवारबाजीचे प्रशिक्षण मिळाले. माध्यमिक शिक्षण संपल्यानंतर ते पुण्याला आले व सदाशिव पेठेतील नरसिंह मंदिराजवळ राहून इंग्रज सरकारच्या सैन्य लेखा सेवेत भरती झाले. येथे असतांना त्यांच्यावर महादेव गोविंद रानड्यांचा प्रभाव पडला व भारताच्या खालावलेल्या आर्थिक परिस्थितीचे कारण ब्रिटिश धोरणे होती हे त्यांच्या लक्षात आले. त्याच वेळी क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवेंच्याही प्रभावात होते. स्वातंत्र्य मिळवण्याचे आणि  मागासलेल्या जातींनाही या लढ्यात सामील करून घेणे महत्त्वाचे असल्याचे रानड्यांना पटवून दिले.

     आपल्या अंथरुणाला खिळलेल्या मरणासन्न आईला भेटण्यासाठी फडक्यांनी रजा मागितली असता त्यांच्या इंग्रज अधिकाऱ्याने टाळाटाळ केली. फडके रजा मिळून घरी जाई पर्यंत त्यांच्या आईचा स्वर्गवास झालेला होता. संतप्त झालेल्या फडक्यांनी आपली सरकारी नोकरी सोडून दिली व त्यानंतर ब्रिटिश सरकारच्या धोरणांविरुद्ध जाहीर भाषणे देण्यास सुरुवात केली. 1870 च्या दशकातील पडलेल्या दुष्काळाकडे सरकारचे दुर्लक्ष पाहून त्यांनी स्वतः दुष्काळग्रस्त भागात जाऊन तेथील लोकांना मदत केली व त्याच वेळी सरकार उलथवून देण्याची भाषा करण्यास सुरुवात केली.

      1879 नंतर फडके यांच्या कार्याला सुरुवात झाली. त्यांनी दौलतराव नाईक यांच्या मदतीने लोणी जवळ धामरी गावावर पहिला दरोडा टाकला यामध्ये त्यांना फक्त तीन हजार रुपये मिळाले. 25 ते 27 फेब्रुवारी 1879 रोजी लोणी व खेड वर दरोडा टाकून लुटमार केली. 5 मार्च 1879 रोजी जेजुरी जवळ वाल्हे गावावर दरोडा टाकला.  या लुटीत त्यांना चार बंदुका, तीनशे रुपये व शंभर रुपयांचे कापड मिळाले. यानंतर त्यांनी सरकारविरुद्ध सशस्त्र उठाव करण्याची तयारी सुरू केली. सुरुवातीला त्यांनी पुणे मुंबई व इतर शहरातील सुशिक्षित व धनाढ्य भारतीयांकडे मदतीची मागणी केली परंतु प्रतिसाद मिळाला नाही.

      फडक्यांनी मग तथाकथित मागासलेल्या जातींमध्ये मदत शोधली. मातंग, रामोशी, धनगर, कोळी आणि इतर अनेक समाजातून त्यांनी तरुण घेतले व त्यांना शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण देऊन आपल्या सैन्यात भरती केले. अशा काहीशे सैनिकांसह त्यांनी इंग्रज सरकारविरुद्ध अधिकृतरीत्या युद्धाची घोषणा केली. शिरुर आणि खेड तालुक्यातील सरकारी खजिन्यावर धाड टाकून फडक्यांच्या सैन्याने आपला चरितार्थ चालविला. त्यानंतर त्यांनी थेट पुण्यावर चाल केली आणि काही दिवसांकरता शहरावर कब्जा मिळवला. एकाच वेळी अनेक ठिकाणी हल्ला चढवून इंग्रज सरकारचे लक्ष विकेंद्रित करण्याच्या त्यांच्या चालीला यश मिळाले नाही आणि इंग्रज सरकारने भारतातील हा पहिला सशस्त्र उठाव चिरडण्याचा चंग बांधला. धानूर गावाजवळ झालेल्या हातोहातच्या लढाईनंतर भारतीयांत फितूरी लावण्यासाठी सरकारने फडक्यांना पकडून देण्याबद्दल इनाम जाहीर केले. याला प्रत्युत्तर म्हणून फडक्यांनी मुंबईच्या गव्हर्नरला पकडून देणाऱ्यास त्याहून मोठे इनाम जाहीर केले. याचबरोबर साप-किरड्यांना मारल्यावर मिळणाऱ्या बक्षिसाप्रमाणे प्रत्येक युरोपीय व्यक्तीला मारण्याबद्दलही त्यांनी इनाम जाहीर केले. या लढाईनंतर फडके अरब व रोहिल्यांकडून मदत मिळवण्यासाठी हैदराबाद संस्थानात गेले तेथील निजामाच्या सेवेत असलेल्या अब्दुल हक आणि मेजर हेन्री विल्यम डॅनियेल या अधिकाऱ्यांनी फडक्यांचा पिच्छा पुरवला आणि त्यांना परत महाराष्ट्रात पळून येण्यास भाग पाडले. 

      1879 रोजी पंढरपूर कडे जात असताना कलदगी गावातील देवळात तुंबळ लढाई पश्चात इंग्रज सरकारने फडक्यांना जिवंत पकडले व पुण्याच्या तुरुंगात ठेवले. तेथे त्यांच्यावर खटला चालवण्यात आला. पुण्यातील एकाही वकिलाने त्यांचे वकीलपत्र घेण्याची तयारी दर्शवली नाही. शेवटी सार्वजनिक काकांनी त्यांचे वकीलपत्र घेतले व त्यांचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. त्यांना आजीवन कारावास व तडीपारीची शिक्षा झाली. त्यांना अरेबियातील एडन येथील तुरुंगात पाठवण्यात आले. तेथे एकांतवासाची शिक्षा भोगत असलेल्या फडक्यांनी एके दिवशी आपल्या कोठडीचे दार बिजागऱ्यांसकट उचकटून काढून तुरुंगातून पळ काढला. काही दिवसांनी इंग्रजांनी त्यांना परत पकडले व पुन्हा तुरुंगात टाकले. तेथे आपल्याला मिळत असलेल्या वागणुकीविरुद्ध फडक्यांनी आमरण उपोषण केले व त्यांना फेब्रुवारी 17 इसवी सन 1883 रोजी मृत्यू आला.

      त्यांच्या स्मरणार्थ भारतीय टपाल खात्याने फडक्यांचे चित्र असलेले 50 पैशांचे तिकीट प्रकाशित केलेले.

 मुंबईतील मेट्रो सिनेमा जवळच्या चौकाला वासुदेव बळवंत फडके यांचे नाव दिलेले आहे.

             🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳

🌹🙏 *विनम्र अभिवादन*🙏🌹
          
➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा